Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

August 2015
Aai Aai/Baba Aarti Prabhu Aashadi Ekadashi Aathvan Aayushya Adarsh Vyaktimatva Akshay Tritiya Anna Hazare Ashru Baba Baiko Balasaheb Thackeray Balpan Bhaubeej Bhavana Bhet Breakup Chandrashekhar Gokhale Charolya Cricket Dasara Datta Jayanti Dev Dhantrayodashi Din Vishesh Diwali Dr. Ambedkar Jayanti Dukh Durava Ektepana Gadge Maharaj Ganpati Gokulashtami Gudi Padwa Guru Poornima Hanuman Jayanti Holi Itar Kavita Jagatik Mahila Din Jai Satguru Jivan Kamlesh Gunjal Kavi Grace Kojagiri Purnima Kshan Premache Kusumagraj Lagna Lakshmi Pujan Lal Bahadur Shastri Lata Mangeshkar Lokpriya Kavi Maasaheb Jijabai Jayanti Maharashtra Din Mahashivratri Mahatma Jyotiba Phule Maitri Maitri Divas Maitrin Makar Sankranti Mangesh Padgaonkar Mann Marathi Bhasha Din Marathi Kavita Marathi Lekh Marathi Prem Kavita Mithi Mitra Mumbai Terrorist Attacks Najar Nanashaheb Dharmadhikari Narali Purnima Nate Nav Varsh Navratri Odh Pahila Paus Pahila Prem Pahili Bhet Pandharpur Wari Paus Kavita Prajasattak Din Prem Prem Divas Prem Mhanje Nakki Kai Aste Prem Patra Premat Priyasi Pu. La. Deshpande Rahul Dravid Rakhi Purnima Rakhshabandhan Ramdas Swami Rangpanchami Republic Day Sachin Tendulkar San-Utsav Sandeep Khare Sandhyakal Saumitra Shala Shanta Shelke Shikshak Din Shivaji Maharaj Shivjayanti Shravan Shree Ram Navami Shri Parshuram Jayanti Shringar Shubh Din/Shubh Ratra Sindhutai Sapkal Sobat Sparsh Sukh Sundari Suprabhat Suresh Bhat Suvichar Swami Vivekanand Swapna Swapnasundari Swatantra Din Tu Tu Aani Me Tu Yetes Tevha Tujhyasathi Tujhyavina Tulsi Vivah Ukhane Va. Pu. Kale Vaat Vadhdivas Valentine's Day Vande Mataram Vapurza Vasu Baras Vat Savitri Veer Savarkar Jayanti Vel vidamban Vinda Karandikar Vinodi Vinodi Kavita Viraha Vishwas

अरे काळ्याभोर ढगा !!!
बरस की रे आज!
ऑगष्ट जातोय उलटून
निदान बाळग थोडी लाज!

सृष्टीचाच नियम म्हणून
तुलाही घे लाच!
दोन पैसे जास्तीे घेऊन
मोरांसाठी नाच!!

त्याचा सुद्धा तुझ्यावर
विश्वास नाही राहिला!
फुलोरा करून पिसांचा
डिजेवर नाचू लागला !

काय तुझा पूर्वीचा तो
होता कसा थाट
चातकं सुद्धा तुझी आता
पहात नाही वाट

तहानलेला कावळा आता
गोष्टीं मध्येच राहीला,
वाट पाहून पाहून तुझी,
बिसलरी पिऊ लागला!!

मित्र घेऊन काळेकुट्ट
विजांसोबत गरज,
सवाल तुझ्या इमेजचा
आता तरी बरस !!!!
आता तरी बरस !!!

"तुझ्यावरच्या कविता" मधील एक अप्रतिम रचना

तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता

तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता

तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता

डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता

निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता

तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता

पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता

चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता

संदीप खरे

निळ्या नभातुन बरसेल श्रावण
उन-पावसाचा खेळ करेल श्रावण

तहानलेल्या या धरतीला
धुंद सरींचा घोट पाजेल श्रावण

तना-मनास चिंब भिजवेल श्रावण
शब्दांची धुंद-तार छेडेल श्रावण

मस्त हवेच्या मौसमाने
या मनास मुक्तछंद लावेल श्रावण

हर्ष-उल्हास देईल श्रावण
फ़ुलण्याची नवी आस होईल श्रावण

हिरव्या नवलाईच्या शालुने
आज या धरणीस सजवेल श्रावण

ह्रुदयातली आग विझवेल श्रावण
प्रेमळ सरींनी भिजवेल श्रावण

काल नयनातुन बरसणा-या
थेंबालाआज नभातुन बरसवेल श्रावण
श्रावणाच्या हार्दीक शुभेछ्चा.................

- सचिन काकडे

असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघांनाही सांगता येत नही …
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्दं मात्र ओठांत येत नाहीत …

मंगलमय दीपपूजन की लाजिरवाणी गटारी? येत्या शुक्रवारी आषाढातील अमावस्या आहे. हल्ली या दिवसाला आपल्याला खरेतर लाज वाटावी इतकी कुप्रसिद्धी, “गटारी” म्हणून मिळत आहे.जेव्हा आमच्या आजूबाजूची अमराठी माणसे”गटारी”चा अर्थ विचारतात तेव्हा आमचेच काही मित्र “त्या दिवशी इतकी प्यायची की गटारात पडून गटारे फुल झाली पाहिजेत”,अशी फुशारकी मारतात.आपल्या समाजातील चांगल्या प्रथा एकमेकांना दाखविण्याच्या स्पर्धेच्या या दिवसात आम्ही मात्र अशा फुशारक्या मारतो.अमराठी लोकांना वाटते की काय यांचे हे गटारात पडायचे सण? शीs!
वास्तविक पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे.कारण-

१) या कुंद पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.
२) हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो.याच काळात प्राण्यांची हत्या केली तर साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) बाहेरच्या वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते.शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
त्यामुळे एकदा याला धार्मिक जोड दिली की अपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
पुढे ४ महिने साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांसाठी,पूजांसाठी तयारी म्हणून पूर्वींच्या मोठमोठ्या घरातून विविध दिवे शोधून ते साफसूफ करून या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजले जात असत.आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून,अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण नैवेद्य दाखवतात.खूप आनंददायी आणि मंगलमय अशा या सोहोळ्याची
माध्यमांकडून दाखलच घेतली जात नाही. या उलट ४० टन चिकन-२० टन मटण—रोज १५/२० बोकड लागणार,दारूड्यांवर पोलिसांची नजर,अनेक हॉटेलात खास package अशा बातम्या चघळल्या जात आहेत.आपली उत्सवप्रियता पाहता आता यात DJ चा दणदणाट,प्रायोजकांच्या कमानी,चीअरगर्ल्सचा नाच इ.गोष्टी फार लांब नाहीत.
शास्त्रीय कारण असलेल्या पण फार महत्व नसलेल्या “गटारी”चे आपण लाजिरवाणे उदात्तीकरण करायचे की लाखो मराठी घरातील मंगलमय दीपपूजनाची लोकांना माहिती करून द्यायची ?... आपण हा निर्णय आता घ्यायलाच हवा.
गेली कित्येक वर्षे मी माझ्या पातळीवर ही विनंती अनेकांना करीत आहे. आपणही या दिवशी आपल्या घरातील सर्व दिव्यांची जरूर पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया !
दीपज्योति: परब्रह्म दिपज्योतीर्जनार्दन:I
दीपोहरतु मे पापं दीपजोतिर्नमोस्तुते II

आठवण - एक हृदयस्पर्शी कथा

तिने पुन्हा एकदा टेबलवरच्या डायरीमधला तो कागदाचा चिटोरा उचलला. परत त्यावरच्या नंबरवरून नजर फिरवली. पुन्हा टेबलवर ठेवलेल्या मोबाइलवर नजर खिळली, पुन्हा मन do or do not मध्ये अडकले. मनातल्या मनात पुन्हा येऊ शकणारे सगळे reactions तपासून पाहिले. नजर शून्यात लागलेली … आज सकाळ पासून हे असंच चाललंय तिचं …… घरातल्या कुठल्याही कामात मनंच लागत नव्हतं.

नाही ! मानेला हलकासा झटका देत तंद्रीतून बाहेर पडत ती पुटपुटली

पुन्हा चिटोरा डायरीच्याआत ढकलला आणि उठली जागेवरून. चिटोरा ठेवला तरी त्यावरचा नंबर मनात उचंबळ्या खात होता. मनात विचारांचा घोळ चालूच होता. ती किचनच्या ओट्याजवळ आली, हंड्यातून पाणी काढून प्याल्यात ओतले आणि प्याला ओठांना लावत घटाघटा प्यायली, ग्लास ओट्यावर ठेवत वळली अन ओट्याला टेकून तशीच उभी राहिली…. विचारांची तंद्री पुन्हा … किती वेळ तिलाही कळालंच नाही.

सात वर्ष निघून गेलीत, कॉलेजचा तो दिवस अजूनही तसाच डोळ्यासमोर उभा राहायचा तिच्या,

ती नौकरी करायची, गरजच तशी होती. वडील नसलेल्या तिला घर चालवण्यासाठी, लहान भावाच्या शिक्षणासाठी आईची मदत करणं गरजेचं होतं. पण शिक्षण सोडायचं नव्हतं. खूप शिकावं हा ध्यासच होता तिचा.

त्या दिवशी अशीच डोळ्यात पाणी घेऊन मुसमुसत कॉलेजच्या ऑफिस मधून बाहेर पडली आणि अक्षयशी नजरानजर झाली. …पहिल्यांदाच …
क्लासमेट म्हणून एकमेकांना ओळखत होते पण यापूर्वी कधीही ते एकमेकांशी बोलले नव्हते. आणि आत्ता तो पुढ्यात उभा राहून तिला न्याहाळत होता. तिच्या पडलेल्या चेहेऱ्यावर काहीतरी शोधू पाहत होता. ती नजर चोरून वळून जाऊ पाहत होती पण तो आणखीच तिच्या पुढे आला त्याच्या नजरेने तिचे अश्रू हेरले होते …

तो "थांब, काय झालं ??"
तिनं 'काही नाही' असा मानेनेच नकार दिला
तो " hello, tell me what happen ? कोणी काही बोललं का तुला ?"

त्याच्या या शब्दांनी तिचे डोळे अधिकच वाहू लागले….

" एग्झामचा फॉर्म भरायला नाही म्हणताहेत सर, माझी प्रेझेंटी कमी पडतेय"

तो " असं कसं म्हणताहेत ? तू चल माझ्यासोबत " असं बोलून त्यानं हात धरला तिचा आणि घेऊन गेला परत ऑफिसमध्ये

अक्षयच्या बोलण्यात जादू होती कि सांगण्याची पद्धत तशी वेगळी कळालं नाही पण एग्झाम दिली तिने

त्यानंतरही त्यानं अनेकदा तिच्याशी असलेली मैत्री प्रत्येकवेळी निभावली तिच्या प्रत्येक अडचणीत तिला साथ दिली.

ती मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कधीच त्याला बोलू शकली नाही मनात असूनही "माझा धरलेला हात सोडू नकोस रे, मला हवायेस तू "

आज सात वर्षांनी ती शोधतेय त्याला परत, त्याच्या आठवणीने व्याकूळ होतेय …. तो दिवस डोळ्यासमोर तरळतोय सारखा. आजही डोळ्यात अश्रू आहे तिच्या तीन वर्षाच्या बाळाला घेऊन व्यसनी नवऱ्याचा अत्याचार सहन करतेय ती …
पण तिचा हात धरून आणून नवऱ्या समोर उभे करून त्याला ठसक्यात जाब विचारणारा कोणीच नाहीये हि जाणीव प्रखर झाली होती गेल्या काही दिवसात ….

गुगल वरून त्याचा नंबर शोधून काढला होता तिनं काल रात्री …. आणि आज सकाळ पासून तिचा तिच्या मनावर ताबाच उरलेला नाही.

तंद्री तुटली तिनं पुन्हा इकडे तिकडे पाहीलं चेहेऱ्यावरून हात फिरवला …. घड्याळ १ वाजल्याचं दाखवत होतं . दीड वाजता मिलिंद जेवायला येईल त्या आधी एकदा बोलून घेऊया का अक्षयशी ?… तिचं मन पुन्हा आगतिक झालं

तिनं मोबाइल उचलला नंबर फिरवला ….
समोरून आवाज आला त्याचा "हेलो…येस्स ?"

ती सकपकली जरा, काहीवेळ स्तब्ध …निरव शांतता इकडेही अन तिकडेही …

ती 'अं सॉरी… च च चूकून लागला हो फोन ……' रीसिवर ठेवून दिला तिनं

तिच्या हृदयाचे ठोके प्रचंड गतीने वाजत होते 'हेलो…येस्स.' त्याचा आवाज कानात सारखा वाजत होता.
आपला आवाज ओळखला असेल का त्यानं ? छे छे !!

दोनंच मिनिट

दोनंच मिनिटात तिचा फोन पुन्हा वाजू लागला …वाजत राहिला अखंड

भरल्या डोळ्यानं तिनं पाचवा फोन उचलला … तोच ओळखीचा आवाज

" थांब! फोन ठेवू नकोस, काय झालं …. tell me what happen ? कोणी काही बोललं का तुला ?"

त्याच्या या शब्दांनी तिचे डोळे अधिकच वाहू लागले….

ती नुसतीच मुसमुसत राहिली मग काहीही न बोलता … !!

- मयी

कुसुमाग्रज यांची अजरामर कविता "कणा" याचे एक वेगळे विडंबन.
कवी, आपल्या मराठी कविता ब्लॉग चे वाचक संदेश घारे . अभिप्राय कालवा

Appraisal cha "फणा"

ओळखलत का साहेब मला ,
अचानक आलं कुणी,
कपडे होते चुरघळलेले आणि अंगात घामाचं पाणी,

क्षणभर बसला मग हसला ,
बाेलला वरती पाहुन,resignation घ्या सर increment गेलं करायचं राहुन,

पगार वाढीचा विषय ऩिघताच झटकन उठला,
नको पुन्हा ती स्वप्न म्हणताना कंठ त्याचा दाठला,

Appraisal चे गाजर दाखवुन काम खुप काढले,
वर्षाचा शेवटी फक्तं ५००रुपये वाढले,

जबाबदारीचा ओजाखाली employee मात्र असाच झिझतो,
५०० रुपयांचा हीसाब मात्र नुसता पेपरवरच दीसतो,

Appraisal चा game cha करा repeat telecast,
वेळ न दवडता मला Release करा fast

कवी
संदेश घारे


प्रिय,
तू म्हणालीस
सारखं सारखं नको भेटायला,
उगाच सवय लागायची…
पण भेटत जाऊ आपण
नाहीतर उगाच सवय लागायची,
न भेटण्याची …
~ मिलिंद जोशी 

परिचयातुन जुळते ती मैत्री,
विश्वासाने जपते ती मैत्री,
सुखात साथ मागते ती मैत्री,
आणि दुःखात साथ देते ती मैत्री,
चुकावर रागवते ती मैत्री,
यशावर सुखावते ती मैत्री,
पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री,
डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री,
आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री..!!!
HAPPY FRIENDSHIP DAY...

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget