Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

अंगठी अनामिकेत का ???

अंगठी अनामिकेत का ???

विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत
अंगठी घालतात.
ही अंगठी अनामिकेतच
का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत?

एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा ....
.
.
त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे. हे एक कुटुंब.

त्यातील अंगठा हे आपल्या आई-वडिलांचे प्रतीक.

अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे प्रतीक.

मधले बोट म्हणजे आपण स्वत:

चौथे अनामिका... म्हणजे आपला जोडीदार,

तर करंगळी म्हणजे आपली अपत्ये.

ही झाली गृहीतकं.
आता पाहू या कुटुंबातील
या घटकांशी आपली नाती कशी आहेत
ती.

हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे जोडा.

मधली बोटे दुमडून बाकी बोटांची फक्त वरची टोकं जुळवा. आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर करा. ते उघडता येतील. कारण आई-वडील काही जन्मभर लाभत
नाहीत. कधी ना कधी ते
आपल्याला सोडून जातात.
.
.
अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे उघडा. तीही उघडतील. कारण भावंड त्यांना त्यांची कुटुंबं आहेत. स्वत-ची आयुष्यं आहेत.
.
.
आता ती बोटं जुळवून
आपल्या करंगळ्या उघडा. त्याही उघडतील. कारण तुमची मुलं मोठी झाल्यानंतर घरटं सोडून भरारी घेणारच आहेत.
.
.
आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून वेगळ्या करा.

आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत. कारण जोडीदार, म्हणजे
पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात.
ते सुखात आणि दुखातही एकमेकांना साथ देतात...!

Labels:

Post a Comment

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget