बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, मुंबानगरीच्या बा देवा महाराजा...
आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा, टोरा, म्हातारे-कोतारे मिळान साजरो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि काय जी इडा पीडा, वाकडा-नाकडा असात त दूर कर रे महाराजा...
ह्या होळी सोबत सगळ्यांच्या मनातलो राग, रूसवो-फूगवो जळान खाक होऊ देत आणि सगळी माणसां माणुसकी एकमेकांसोबत नांदु देत रे महाराजा ...
होय महाराजा !
Monday, March 09, 2020
Sunday, March 08, 2020
स्त्री..
स्त्री...
तुझ्या शक्तीला सलाम
तुझ्या कर्तुत्वाला सलाम
तुझ्या धेर्याला सलाम
कितीही लढलीस
कितीही पडलीस
कितीही सोसलंस
तरी तुच तुला सावरलंस
नाती सांभाळुन पिढी जपणारी तु
नोकरी सांभाळुन घर जपणारी तु
घर सांभाळुन घर चालवणार्याला जपणारी तू
प्रत्येक पिढीला एक आदर्श देणारी तु
स्त्री..
तुझ्या जन्माला सलीम
तुझ्या कार्याला सलाम
- प्रतिभा येवले
Friday, February 28, 2020
गवताचं पातं - कुसुमाग्रज Gavtacha Pata Kusumagraj
गवताचं पातं - कुसुमाग्रज
गवताचं पातं वार्यावर डोलतं,
डोलतांना म्हणतं खेळायला चला
झर्यातलं पाणी खळा-खळा हसतं,
हसताना म्हणतं खेळायला चला
निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला
झिम्मड पावसात गारांची बरसात,
बरसात म्हणते वेचायला चला
छोटासा मोती लपाछपी खेळतो,
धावतांना म्हणतो शिवायला चला
मनीचं पिल्लू पायाशी लोळतं,
लोळतांना म्हणतं जेवायला चला
अहो, जेवायला चला
तुम्ही जेवायला चला
#कुसुमाग्रज
डोलतांना म्हणतं खेळायला चला
झर्यातलं पाणी खळा-खळा हसतं,
हसताना म्हणतं खेळायला चला
निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला
झिम्मड पावसात गारांची बरसात,
बरसात म्हणते वेचायला चला
छोटासा मोती लपाछपी खेळतो,
धावतांना म्हणतो शिवायला चला
मनीचं पिल्लू पायाशी लोळतं,
लोळतांना म्हणतं जेवायला चला
अहो, जेवायला चला
तुम्ही जेवायला चला
#कुसुमाग्रज
Thursday, February 27, 2020
मराठी भाषा दिननिमित्त सर्वांना शुभेच्छा !
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषा दिननिमित्त सर्वांना शुभेच्छा !
मराठी भाषा दिननिमित्त सर्वांना शुभेच्छा !
Friday, February 21, 2020
ॐ नमः शिवाय - Mahashivratri
ॐ नमः शिवाय 
कैलास राणा शिवचंद्र मौळी ! फणिंद्र माथा मुकुटी झळाळी! कारुण्य सिंधु भवदुःख हारी ! तुजविण शंभो मज कोण तारी
कैलास राणा शिवचंद्र मौळी ! फणिंद्र माथा मुकुटी झळाळी! कारुण्य सिंधु भवदुःख हारी ! तुजविण शंभो मज कोण तारी
Wednesday, February 19, 2020
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा 

Sunday, February 09, 2020
Saturday, February 08, 2020
Friday, February 07, 2020
Sunday, February 02, 2020
पती-पत्नी एक अनोखं नातं ..
पती-पत्नी एक अनोखं नातं .....
....................................
दोन वेगवेगळे मने ,जीव ,
आता शुभमंगल सावधान नंतर....
एकत्र आलेली असतात ...
त्याच्या विश्वात रमणारा तो
तिच्या विश्वात रमणारी ती ..
आता एकमेकांचा विश्वातं.....
रमणारी असतात......
कारण आता ते ......
साता जन्मा साठी एकत्र आलेली असतात ......
आयुष्यात बरीच नाती अशी असतात जी आपल्या जन्मासोबत जोडलेली असतात.. जसे की, आई-वडील , बहिण-भाऊ , आजी आजोबा ,पण एक नातं असा आहे ते जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत काही कळत नाही...
ते नातं म्हणजे " पती-पत्नीचं ".
आयुष्याच्या वळणावर कधी काय होईल हे सांगता येत नाही .. कदाचित त्याच्यामुळेच " आयुष्य हा ऊन-पावसाचा खेळ आहे " असे म्हणतात ...
कदाचित " आयुष्य हा एक रंगमंच आहे ". यातील आपण फक्त एक कलाकार आहोत ..
जी पात्र आपणाला नियतीने लिहून दिलेली आहेत ,ती फक्त आणि फक्त आपण बजावत असतो ....
ज्यांना अगोदर कधीही ही साधे बघितले ही नाही ,ही अचानक दोघेही लग्नाच्या अतूट बंधनात शुभमंगल सावधान नंतर एकत्र येतात .....जसे की " सूर्योदय व सूर्यास्त " हा दिवसाचा अविभाज्य भाग होऊन जातात ...
" पती-पत्नी " . हे नातं विश्वास , त्यागं , समर्पण , जिव्हाळा , आपुलकी , निस्वार्थ प्रेम , या धाग्याने जोडलेले असत...
पूर्वी दोघेही एकमेकांच्या विश्वास रमणारी , आता एक दुसर्याच्या विश्वात आपली दोघांची स्वप्ने बघत असतात ....
एकाला कधीही तडजोड माहित नसते ..तरीपण तिच्यासाठी तो जीव लावून करत असतो ..कारण त्याला आता तिचे आयुष्य सुखी करायचे असते ...
तर दुसरीकडे एकदम आनंदात वावरणारी .. " जिला आई-वडिलांनी तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळ केलेली " ती ...आता दिवसभर संसाराच्या चक्रात स्वतःला झोकून देते...
जी कधीही चुलीसमोर न बसलेली ...आता ती त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने गोड गोड स्वयंपाक करत असते ...
कारण आता ती त्याच्या साठी लागणारी प्रत्येक गोष्ट , अगदी आनंदाने व प्रेमाने करत असते.....
कारण आता तिला सुखी संसार करायचा असतो ....
आता एकमेकांना एक गोष्ट कळून चुकलेली असते " आपलं सुख हे एक-मेकांच्या सुखात आहे " आयुष्याच्या चढ-उतारात ते एकमेकासोबत खंबीरपणे उभे असतात ....म्हणूनच म्हणतात ना एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो ....
ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची " अर्धांगिनी " असते ..
दोघा पासून सुरू झालेला संसाराचा गाडा पुढे वाढत जातो...
दोघांचे तिघे होतात ...
पण त्यांच्या प्रेमात मात्र कायमच वाढ होत असते... आणि सगळ्यात महत्वाचे होते जेव्हा त्याला तिच्यात त्याची " प्रेयसी " दिसते ... व तिला त्याचातं तिचा " प्रियकर " दिसतो ....
मग तर कोणाची नजर लागेल असा हा " राजा-राणीचा " संसार होतो ....
आयुष्यामध्ये दोघेही एकमेकांशी पूर्णपणे समरस झालेली असतात ... आता त्याच्या पत्नीचा रोल फार मोठा झालेला असतो ...कधी कधी संकटात ती त्याची ढाल बनून उभी राहते ... समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला ती त्याच्यासोबत असते ..
जरी ते दोनं जीव असले ..तरी आता ते एक जीव झालेले असतात ...
खरंतर दोघांची एकमेकांना साथ त्यांच्या वयाच्या उतरत्या काळात असते ...
कारण तेव्हा " पैसा हा गोण झालेला असतो " .कारण त्यांची लहान पाखरे आता मोठी झालेली असतात ....स्वतःच्या पंखावर ऊडू लागलेली असतात ...
ते त्यांचे स्वतःचे घरटे तयार करण्यात मग्न असतात ....त्यावेळेस मात्र या दोघांचा पंखातले बळ पहिल्यासारखे राहिलेले नसतं... पण त्यांचं एकमेकावर असलेलं निस्सीम प्रेम त्यांना परत बळं देतं ...
कारण आताही तो तिच्यात प्रियसी बघत असतो ...
व ती त्याचातं प्रियकर बघत असते ....
" नातं पती-पत्नीचं जरा ...
जगा वेगळं असतं ....
दोघात कुठून एवढं प्रेम असतं ....
याचं उत्तर त्यांच्यापाशी नसतं .....
संसाराचा रथाची हे दोन चाके असतात ......
कधी कधी एक बिघडलं तरी ..
ते एकमेकाला सांभाळून घेतात...
डॉ .सदाशिव रोकडे
सुरत
9824518156
....................................
दोन वेगवेगळे मने ,जीव ,
आता शुभमंगल सावधान नंतर....
एकत्र आलेली असतात ...
त्याच्या विश्वात रमणारा तो
तिच्या विश्वात रमणारी ती ..
आता एकमेकांचा विश्वातं.....
रमणारी असतात......
कारण आता ते ......
साता जन्मा साठी एकत्र आलेली असतात ......
आयुष्यात बरीच नाती अशी असतात जी आपल्या जन्मासोबत जोडलेली असतात.. जसे की, आई-वडील , बहिण-भाऊ , आजी आजोबा ,पण एक नातं असा आहे ते जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत काही कळत नाही...
ते नातं म्हणजे " पती-पत्नीचं ".
आयुष्याच्या वळणावर कधी काय होईल हे सांगता येत नाही .. कदाचित त्याच्यामुळेच " आयुष्य हा ऊन-पावसाचा खेळ आहे " असे म्हणतात ...
कदाचित " आयुष्य हा एक रंगमंच आहे ". यातील आपण फक्त एक कलाकार आहोत ..
जी पात्र आपणाला नियतीने लिहून दिलेली आहेत ,ती फक्त आणि फक्त आपण बजावत असतो ....
ज्यांना अगोदर कधीही ही साधे बघितले ही नाही ,ही अचानक दोघेही लग्नाच्या अतूट बंधनात शुभमंगल सावधान नंतर एकत्र येतात .....जसे की " सूर्योदय व सूर्यास्त " हा दिवसाचा अविभाज्य भाग होऊन जातात ...
" पती-पत्नी " . हे नातं विश्वास , त्यागं , समर्पण , जिव्हाळा , आपुलकी , निस्वार्थ प्रेम , या धाग्याने जोडलेले असत...
पूर्वी दोघेही एकमेकांच्या विश्वास रमणारी , आता एक दुसर्याच्या विश्वात आपली दोघांची स्वप्ने बघत असतात ....
एकाला कधीही तडजोड माहित नसते ..तरीपण तिच्यासाठी तो जीव लावून करत असतो ..कारण त्याला आता तिचे आयुष्य सुखी करायचे असते ...
तर दुसरीकडे एकदम आनंदात वावरणारी .. " जिला आई-वडिलांनी तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळ केलेली " ती ...आता दिवसभर संसाराच्या चक्रात स्वतःला झोकून देते...
जी कधीही चुलीसमोर न बसलेली ...आता ती त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने गोड गोड स्वयंपाक करत असते ...
कारण आता ती त्याच्या साठी लागणारी प्रत्येक गोष्ट , अगदी आनंदाने व प्रेमाने करत असते.....
कारण आता तिला सुखी संसार करायचा असतो ....
आता एकमेकांना एक गोष्ट कळून चुकलेली असते " आपलं सुख हे एक-मेकांच्या सुखात आहे " आयुष्याच्या चढ-उतारात ते एकमेकासोबत खंबीरपणे उभे असतात ....म्हणूनच म्हणतात ना एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो ....
ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची " अर्धांगिनी " असते ..
दोघा पासून सुरू झालेला संसाराचा गाडा पुढे वाढत जातो...
दोघांचे तिघे होतात ...
पण त्यांच्या प्रेमात मात्र कायमच वाढ होत असते... आणि सगळ्यात महत्वाचे होते जेव्हा त्याला तिच्यात त्याची " प्रेयसी " दिसते ... व तिला त्याचातं तिचा " प्रियकर " दिसतो ....
मग तर कोणाची नजर लागेल असा हा " राजा-राणीचा " संसार होतो ....
आयुष्यामध्ये दोघेही एकमेकांशी पूर्णपणे समरस झालेली असतात ... आता त्याच्या पत्नीचा रोल फार मोठा झालेला असतो ...कधी कधी संकटात ती त्याची ढाल बनून उभी राहते ... समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला ती त्याच्यासोबत असते ..
जरी ते दोनं जीव असले ..तरी आता ते एक जीव झालेले असतात ...
खरंतर दोघांची एकमेकांना साथ त्यांच्या वयाच्या उतरत्या काळात असते ...
कारण तेव्हा " पैसा हा गोण झालेला असतो " .कारण त्यांची लहान पाखरे आता मोठी झालेली असतात ....स्वतःच्या पंखावर ऊडू लागलेली असतात ...
ते त्यांचे स्वतःचे घरटे तयार करण्यात मग्न असतात ....त्यावेळेस मात्र या दोघांचा पंखातले बळ पहिल्यासारखे राहिलेले नसतं... पण त्यांचं एकमेकावर असलेलं निस्सीम प्रेम त्यांना परत बळं देतं ...
कारण आताही तो तिच्यात प्रियसी बघत असतो ...
व ती त्याचातं प्रियकर बघत असते ....
" नातं पती-पत्नीचं जरा ...
जगा वेगळं असतं ....
दोघात कुठून एवढं प्रेम असतं ....
याचं उत्तर त्यांच्यापाशी नसतं .....
संसाराचा रथाची हे दोन चाके असतात ......
कधी कधी एक बिघडलं तरी ..
ते एकमेकाला सांभाळून घेतात...
डॉ .सदाशिव रोकडे
सुरत
9824518156
Monday, January 27, 2020
अनोळखी भेट - Anolkhi Bhet
कधी कशी झाली भेट
परकी जागा आपुली वेळ
वक्ता श्रोता गुंतला एवढा
घडली जेव्हा अनोळखी भेट
संकेत कुलकर्णी ( डोंबिवली )
Sunday, January 26, 2020
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
माझी मायभूमी, तुला प्रणाम...
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय 
। प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ।
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
। प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ।
Wednesday, January 15, 2020
Tuesday, December 17, 2019
Wednesday, December 11, 2019
श्री दत्त जयंती
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा||
श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा||
श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा.
आपल्या कुटुंबातील सगळ्यांना भरभरून आयुष्य लाभो ,
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच श्री गुरुदत्त चरणी प्रार्थना ||
Saturday, November 30, 2019
Thursday, November 21, 2019
"वडापाव" Vadapav
शरीराला डाएटिंग ची गरज असते तेव्हा आत्म्याला "वडापाव"ची गरज असते. शरीर हे नश्वर असून आत्मा अमर आहे. म्हणून मी आत्म्याचे ऐकतो.
Sunday, November 17, 2019
Subscribe to:
Posts (Atom)



















